23/03/2020
"बचेंगे तो और भी लढेंगे"
"बचेंगे तो और भी लढेंगे"
आपल्या व इतर मित्र देशांवर जे कोरोना चे संकट आले आहे त्याचा आपण सामना करण्याची हीच खरी वेळ.
भारतातील प्रत्येक नागरिकाला कळकळीची विनंती
कृपया विनाकारण, कामानिमित्त नाही बाहेर पडूच नका. सद्य परिस्थिती आपल्यावर आलीय त्याचा गांभीर्याने विचार करा.. मला काय होत नाही, हसी मजाक करत थाटात स्वताला मिरवू नका. सोशल मीडियाचा वापर योग्य करा विनाकारण चुकीची माहिती पाठवू नका. कृपया जिवंत बॉम्ब बनून स्वताला आणि इतरांना मृत्यूच्या दाढेत ढकलू नका. चीन, इटली,अमेरिका इतर प्रगतशील देशाची अशी परिस्थिती आहे शिवाय प्रगतशील यंत्रणा त्यांच्या कडे असून सुध्दा या संकटांना सामोरं जाण्याची त्यावर मात करण्यासाठी त्यांना अवघड जात आहे त्यापैकी आपल्या भारताकडे एवढी यंत्रणा सुद्धा उपलब्ध नाही आहे तेव्हा कृपया सरकारचे आदेश पाळा स्वतःची व इतरांची योग्य ती काळजी घ्या नक्कीच कोरोना वर आपण विजय मिळवू त्यासाठी आपण सर्वजण शर्थीने प्रयत्न करू. सुजाण नागरिक बनू हिच ती वेळ स्वतहासाठी, घरासाठी, इतरांसाठी, समाजासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची कृपया घरात राहा.
*मी या लढाईसाठी पूर्णपणे माझे योगदान देत आहे आणि आपण??*
_टीम उनाड भ्रमंती_